Thursday, May 15, 2025

गोंदिया शिवशाही बस अपघातात ११ जणांचा मृत्यू : बघा संपूर्ण यादी

गोंदिया जिल्ह्यातील खजरी व डव्वा गावाजवळ दुपारी साडेबारा वाजता शिवशाही बसला अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एक महिला पोलिस कर्मचारी देखील आहे. ३ लोक गंभीर जखमी असून २६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

घटना घडली त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आवश्यक मदत पोहोचवली असून जखमींना तातडीने उपचार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली असून जखमींनी लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांची नावे पुढीलप्रमाणे:

1.स्मिता सूर्यवंशी (३२) – पोलिस कर्मचारी, मोरगाव अर्जुनी

2.मंगला राजेश लांजेवार (६०) – पिपरी, भंडारा

3.राजेश देवराम लांजेवार (६०) – पिपरी, भंडारा

4.कल्पना रविशंकर वाणखेडे (६५) – वरोरा, चंद्रपूर

5.रामचंद्र कनोजे (६५) – चांदोरी, साकोली, भंडारा

6.आन्जिरा रामचंद्र कनोजे (६०) – चांदोरी, साकोली, भंडारा

7.आरीफ अझहर सैयद (४२) – घोटी, गोरेगाव, गोंदिया

8.अझहर अली सैयद (५५) – घोटी, गोरेगाव, गोंदिया

9.नयना विशाल मिटकरी (३५) – बेसा, नागपूर

10.अनोळखी पुरुष (ओळख पटलेली नाही)

11.अनोळखी पुरुष (ओळख पटलेली नाही)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी १० लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश दिला आहे. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील प्रशासनाला मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अपघाताच्या बातम्या देशभरातून पसरल्या असून सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

Related Articles