Thursday, May 15, 2025

निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी; बीड, परभणी प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

नागपूर: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार आणि परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घडलेल्या नासधूस व त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून स्वतंत्रपणे केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणांवर विधानसभेत सविस्तर उत्तर देत घटनांशी संबंधित कारवाईची माहिती दिली.

बीड सरपंच हत्या प्रकरण:

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीशी संबंधित असल्याचा संशय असून ती अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे. देशमुख यांच्या डोळ्यांना मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत वाल्मिक कराड याचा सहभाग आढळून आला आहे. कराडचा देशमुख हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील खंडणीखोर, भूमाफिया आणि वाळू माफियांचा कडेलोट करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली करून जबाबदारी योग्यप्रकारे न पाळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

परभणी हिंसाचार प्रकरण:

परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नासधूस व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ यांना श्वसनाचा जुना आजार होता आणि गळ्याचे हाड आधीच तुटले होते, असे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी सोमनाथ यांच्यावर अनावश्यक बळाचा वापर केला का, याची चौकशी केली जाईल. संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

आमदार राजकुमार बडोले यांची परभणी प्रकरणी न्यायाची मागणी

नागपूर: परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नासधूस व त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

आमदार बडोले यांनी या प्रकरणात पोलिसांवरील कारवाईचा मुद्दा मांडत, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी केली. त्यांनी सांगितले की, “सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजातील होतकरू युवक होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाची कोठडीत मृत्यू होणे दुर्दैवी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांवरील विश्वास उडण्याचा धोका आहे.”

सत्याचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी:

बडोले यांनी या प्रकरणात सखोल चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशीची मागणी केली होती. तसेच त्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर आणि संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली.

आमदार बडोले यांनी परभणीतील तणावग्रस्त परिस्थितीची सखोल चौकशी होऊन दोषींना योग्य शिक्षा व्हावी, असे सांगितले. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत, संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.

आर्थिक सहाय्य व पीडितांना पाठिंबा:

आमदार बडोले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणीही केली होती, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले.

आमदार राजकुमार बडोले यांच्या कडक भूमिकेमुळे परभणी प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले गेले आणि न्यायाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहेत.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

Related Articles