Thursday, May 15, 2025

पवार साहेबांनी भ्रम पसरवू नये – बावनकुळे

मारकडवाडीतील मतदान आकडेवारीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मारकडवाडी येथील मतदान आकडेवारीचा दाखला देत त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एक्स (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

“मारकडवाडी हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, मारकडवाडी गावाने कधीच कोणत्याही एकाच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. या गावातील मतदारांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये कधी राष्ट्रवादी काँग्रेसला, कधी अपक्ष उमेदवारांना, तर कधी भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे हे गाव शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी असल्याचा गैरसमज पसरवला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०१४, २०१९, आणि २०२४ मधील मतदानाचा आकडेवारीचा दाखला

बावनकुळे यांनी २०१४, २०१९, आणि २०२४ च्या निवडणुकांमधील आकडेवारी सादर केली आहे:

  • २०१४ लोकसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मते मिळाली, तर महायुतीतील सदाभाऊ खोत यांना ६६४ मते मिळाली.
  • २०१४ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली, तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.
  • २०१९ लोकसभा निवडणूक: भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना ३९५ मते मिळाली.
  • २०१९ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना १३४६ मते मिळाली, तर भाजपाचे राम सातपुते यांना ३०० मते मिळाली.
  • २०२४ लोकसभा निवडणूक: राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मते मिळाली, तर भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मते मिळाली.
  • २०२४ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना ८४३ मते मिळाली, तर भाजपाचे राम सातपुते यांना १००३ मते मिळाली.

“ईव्हीएमवर आरोप करण्याऐवजी आकडेवारी तपासा”

बावनकुळे यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे की, “लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला यावेळी नाकारले आहे. त्यामुळे ईव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी या गावाच्या मतदारांच्या निर्णयाचा आदर करा. मारकडवाडीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मतदार कधी भाजपाला साथ देतात, तर कधी राष्ट्रवादीला, आणि कधी अपक्ष उमेदवारांना. हे गाव कोणत्याही एका पक्षाचे गड नाही.”

बावनकुळे यांच्या या टीकेमुळे आगामी निवडणुकांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

Related Articles