Monday, March 24, 2025

ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गरोदर महिलेसोबत अतिप्रसंग; साकोली पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, साकोली तालुक्यातील एका गरोदर महिलेला नोकरीचे आमिष दाखवून नागझिरा अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सानगडी येथील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बंडू लिचडे (वय ५०) याच्याविरोधात साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घटना कशी घडली?

२६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी बंडू लिचडे याने पीडित महिलेच्या घरी जाऊन, “तुझा ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण झाला आहे. भंडारा येथे तुला चांगली नोकरी मिळवून देतो,” असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला साकोली बसस्थानकावर येण्यास सांगितले.

महिला ठरलेल्या वेळी बसस्थानकावर पोहोचताच आरोपीने तिला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, भंडाऱ्याला न नेताच त्याने थेट नागझिरा अभयारण्य परिसरातील पिटेझरी येथील टायगर रिसॉर्टमध्ये नेले. तिथे एका खोलीत नेऊन त्याने महिलेला “तू मला खूप आवडतेस,” असे म्हणत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीने महिलेला पुन्हा साकोली बसस्थानकावर आणून सोडले.

गुन्हा उघडकीस कसा आला?

पीडित महिलेने घरी परतल्यानंतर कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, ३१ जानेवारी रोजी तिची प्रकृती खालावली आणि तिला शारीरिक त्रास जाणवू लागला. अखेर तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तिला सोबत घेऊन ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साकोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपीविरुद्ध कठोर कारवाई

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बंडू लिचडे याला तातडीने अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (२), (एच) ६९ २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १५ फेब्रुवारीपर्यंत भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर आणि उपनिरीक्षक सुमित्रा साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींवर विश्वास ठेऊन कुठेही जाण्याआधी योग्य माहिती घ्या आणि गरज असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

“औरंगजेबाच्या कबरीभोवती वादाचा धुरळा! काय होणार पुढे?”

औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. साधी राहावी अशी औरंगजेबाची शेवटची इच्छा होती, पण त्याची कबर आज भव्य मकबऱ्यात बदलली आहे. काही जणांसाठी ती दडपशाहीची खूण आहे, तर काहींसाठी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक! कायद्यातील अडथळे, केंद्र सरकारचा अधिकार, आणि वाढत्या सामाजिक-राजकीय तणावामुळे हा विषय अधिकच गडद होत चालला आहे. कबर हटवता येईल का, आणि सरकार यावर काय निर्णय घेणार — हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!

राज ठाकरेंची ‘खोक्याभाई’ टीका; आशिष शेलार यांचे जोरदार प्रत्युत्तर

"एक खोक्याभाई काय घेऊन बसलात?" या राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे आशिष शेलार यांनी कडवट प्रत्युत्तर देत, "ज्यांना लोकसभेत जागा मिळत नाही, ते बाहेर बसून विधानं करतात," असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

राज्यातला एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव

एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असून, त्यांनी राज्य सरकारला शिक्षणविषयक धोरणावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली आहे.

वाळू तस्करी : महसूलमंत्र्यांचे विभागीय चौकशी आदेश धडकले; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

वैनगंगा आणि बावनथडी नदीतून सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश झाला असून महसूलमंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुचाकीवर लावले जाणारे जिओ टॅग महाराष्ट्र सीमेपर्यंत आणून ट्रक व टिप्परला लावण्याची शक्कल उघड झाली असून यामुळे मोठ्या नावांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुष्का शर्मा ने सांगितली घाटस्पोटाची कारणे

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटांचे वाढते प्रमाण यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. अनुष्काने म्हटले की, "आजच्या काळातील महिला आपल्या जोडीदारासोबत समांतरपणे वाढू इच्छितात. त्या कोणत्याही दबावाखाली जगायचं मानत नाहीत. महिला आता जास्त सहन करीत नाहीत आणि त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे." तिच्या या विधानावर समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुष्काच्या मते, नात्यात पारदर्शकता आणि समानतेचा अभाव असल्यास नातेसंबंध तुटू शकतात.

नागपूरात हिंसाचार, वाहणे जाळली, रात्रीची घटना

नागपूरमधील हिंसाचार 17 मार्च 2025 रोजी महल भागात घडला, जिथे दोन गटांमधील वादामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत दोन वाहने जाळण्यात आली, पथराव झाला, आणि एका फोटोचे जाळले जाणे अहवालात नमूद केले. ही घटना संध्याकाळी 8 ते 8:30 च्या सुमारास घडली, ज्यामुळे परिस्थिती बिकट झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अश्रुधूर आणि बलाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली, तसेच 144 कलम लागू केले.

साकोलीत शिवजयंतीचा जल्लोष! शिवसेना (उबाठा) कडून महामार्गावर महाप्रसाद वितरण

"साकोलीत शिवसेना (उबाठा) तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. महामार्गावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला."

पाटोलेंचा चा प्रस्ताव आणि राजकीय प्रतिक्रिया

"Nana Patole यांनी Ajit Pawar आणि Eknath Shinde ला MVA मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे BJP आणि इतर नेत्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करू शकते."

Related Articles