Thursday, May 15, 2025

मंत्रिमंडळ विस्तारात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विसर

गोंदिया : प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्ह्याला आगामी अडीच वर्षांसाठी पुन्हा एकदा ‘पार्सल पालकमंत्री’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले असले, तरी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते आणि जिल्हावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील विस्तारामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पुन्हा एकदा संधी नाकारली गेल्यामुळे या भागातील जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. स्थानिकांच्या मते, जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले असते तर या भागाचा विकास अधिक वेगाने झाला असता. मात्र, अनेकांच्या दृष्टीने हे जाणूनबुजून टाळण्यात आले आहे, आणि यासाठी थेट प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली जात आहे.

तिरोड्यातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभेत पहिल्यांदा कमळ फुलवणारे विनोद अग्रवाल तसेच अर्जुनी मोरगावमधून विजयी झालेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे इंजिनिअर राजकुमार बडोले यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळेल, अशी जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षाभंगामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे.

गोंदियाचे अपूर्ण स्वप्न : ‘घरचे मंत्री’

गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा आहे. महायुती सरकारमधील अजित पवार गटाचा मजबूत सहभाग लक्षात घेता, गोंदियाला मंत्रीपद मिळेल, असा विश्वास होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात गोंदियाला वगळले गेले.

पाच वर्षांत पाच ‘पार्सल पालकमंत्री’

२०१९ पासून गोंदिया जिल्ह्याला सलग पाच परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले. या पालकमंत्र्यांनी प्रामुख्याने २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट किंवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्ह्याला भेट दिली आणि त्वरित परतल्याचा अनुभव गोंदियाकरांना आहे. परिणामी, गोंदियात त्यांना ‘झेंडा मंत्री’ असे टोकाचे नाव दिले गेले.

नव्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा

गोंदिया जिल्ह्याला पुढील पालकमंत्री कोण मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परजिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्त होणे निश्चित झाले असले, तरी त्यांनी मागील डाग पुसून काढावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने उपस्थित राहून काम करणे, हे नवे पालकमंत्र्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा

जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. या परिस्थितीत स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

गोंदिया जिल्हा विकासासाठी सक्षम नेतृत्वाच्या प्रतिक्षेत असून, आता राज्य सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळले; पटेलांशी तणावाचे जुने वाद चर्चेत

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात धर्मराव बाबा आत्राम यांना वगळण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात त्यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळात स्थानिक पातळीवर अनेक मुद्दे चर्चेत राहिले. विशेषतः, प्रफुल पटेल आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यातील वादामुळे राजकीय वातावरण तापले होते.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

Related Articles