Saturday, February 8, 2025

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची घोषणा, महाविकास आघाडीचे गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर मतदानाला एक महिना उरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मतदारसंघात दहा हजार मतांची फेरफार सुरू आहे आणि मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचा षडयंत्र उघड झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू केले आहे, आणि या प्रक्रियेस चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली आहे.

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

राऊत यांनी सांगितले की, त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि निवडणूक पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली. नाना पटोले यांच्यानुसार, राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप केला गेला आहे.

महाविकास आघाडीने शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघांमध्ये मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप केला आहे.

राऊत म्हणाले, “महायुतीला पराभवाची भीती वाटत असल्याने ते लोकशाहीविरोधात कटकारस्थान करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भात माहिती दिली आहे.”

पटोले यांच्यानुसार, महायुतीला हरण्याच्या भीतीमुळे मूळ मतदारांचं नाव कमी करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी आरोप केला की, बाहेरच्या राज्यांतील मतदारांचे आधारकार्ड जोडून 10,000 लोकांची नावे नोंदवली जात आहेत, ज्यामुळे ओरिजनल मतदारांचे नाव हटवले जात आहे.

ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय, जरांगे पाटलांचा मराठा समाजाला ‘मेसेज’

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

सडक अर्जुनी प्रीमियर लीग (SAPL) चे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न

सडक/अर्जुनी: निसर्ग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सडक अर्जुनी प्रीमियर लीग...

महाराष्ट्रात वाघांच्या शिकारीत वाढ: वनखात्याच्या गाफिलाईमुळे शिकारीचा आकडा वाढला

महाराष्ट्रात गेल्या दीड ते दोन वर्षांत वाघांच्या शिकारीत लक्षणीय...

गोठणगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती संतोष राठी यांचे हृदयविकाराने निधन

अर्जुनी मोर तालुक्यातील गोठणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष राठी...

Related Articles