Tuesday, May 13, 2025

ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय, जरांगे पाटलांचा मराठा समाजाला ‘मेसेज’

जालना : मराठा समाज हा राजकारण करण्यासाठी एकत्र आलेला नव्हता. आपण आरक्षणासाठी समाज म्हणून एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे. त्यांनी आरक्षणाचा घास आपल्या तोंडून हिरावला आहे, असा आरोप करून ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय आहे, अशी उघड भूमिका मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे की सत्ताधाऱ्यांना पाडायचे? यावर मंथन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी समाजाची बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. परंतु उमेदवार उभे केले पाहिजे की उमेदवार उभे न करता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम केले पाहिजे? यावर चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले.

रविवारी राज्यातील समाज एकत्र येत विधानसभेविषयी चर्चा करणार असून दिवसभर मॅरेथॉन बैठका संपन्न होतील. उद्याचा निर्णय हा निर्णायक आहे आणि यावेळी घाई गडबड असायला नको.
उद्या निर्णय चुकायला नको, या निर्णयामुळे समाज अडचणीत येता कामा नये. समाज हा राजकारण करण्यासाठी एक आला नव्हता, आम्ही समाज म्हणून केवळ आरक्षणाकरिता एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे, असे जरांगे म्हणाले.

ज्यांनी समाजाची फसगत केली, त्यांना संपविणे गरजेचे

समाजाची फसगत झाली नाही पाहिजे, आणि आपल्याला जे संपवायला निघाले आहेत, त्यांना संपवणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्याला संपवले त्यांना संपवण्यात देखील विजय असतो. समाज संपवायचा ज्यांनी विडा उचलला आहे तर त्यांनाही संपविणे आपले काम आहे. याला त्याला निवडून आणण्यापेक्षा आपल्या मुलांच्या भविष्यावर कोण गंडांतर आणतंय तोच संपला पाहिजे, हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळवता येतो, असे काही नसते. आपल्याविषयी जो वाईट विचार करतो, आपल्या समाजविषयी द्वेष आहे, त्याला हरवणे सुद्धा विजय असतो. मला दिसत आहे, सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक या सर्वांचे मत एकच होते, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी “बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच निलिजी मेल, उपसरपंच सुनी मेमाम, पंच गणेश कापगते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदना, धम्मगाथा आणि समाजजागृतीपर विचारांतून कार्यक्रम संपन्न झाला.

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

Related Articles