Wednesday, April 30, 2025

अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान; आमदार बडोले यांचा दौरा

सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा आणि खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने धान पिकांसह घरांचे मोठे नुकसान केले आहे. धानाचे पीक नुकतेच फुलोऱ्यावर आलेले असताना अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज प्रत्यक्ष या गावांचा दौरा केला. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि नुकसानग्रस्त शेतजमिनी तसेच घरांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान आमदार बडोले यांनी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडे त्वरित पाठपुरावा करून मदतीची प्रक्रिया गतीमान करावी,” असे निर्देश त्यांनी दिले.

त्यांनी शेतकऱ्यांना धीर देताना सांगितले की, “तुमची ही अडचण मी माझी समजतो. शासन दरबारी तुमच्या मदतीसाठी आवाज उठवण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही.”

या दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, माजी उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, सपना नाईक, किशोर बावनकर, ईश्वर कोरे, प्रल्हाद वरठे तसेच विविध गावांतील सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने तहसीलदार इंद्रायणी गोमासे, तालुका कृषी अधिकारी लिलाधर पाठक, मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यक हेही घटनास्थळी उपस्थित राहून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक सहाय्य जाहीर व्हावे, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

करेगुट्टाच्या जंगलात देशातील सर्वात मोठं नक्षलविरोधी ऑपरेशन – थरार, रणनीती आणि निर्णायक क्षण

देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.

कोहळीटोला गावातील एक दीप अचानक मालवला!”

"झाडीपट्टीतील एक तेजस्वी स्वर हरपला! कोहळीटोला येथील माजी सरपंच व उत्कृष्ट गायक जिवनलालजी लंजे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न."

दहा विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्याचा राजकुमार बडोले फाउंडेशनचा संकल्प

विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनने भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले. दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत फाउंडेशनने नव्या स्वप्नांना पंख दिले.

विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण स्वप्नांना उधाण; एक संधी जी आयुष्य घडवेल!

अर्जुनी मध्ये होणार विशेष मार्गदर्शन — परदेशी शिक्षणासाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती, प्रवेश प्रक्रिया, व प्रसिद्ध समुपदेशकांचे मार्गदर्शन एकाच छताखाली!

“कोण घाबरलं? जैन मंदिर कारवाईनंतर अधिकाऱ्याची बदली… कुणाच्या दबावाखाली?”

विलेपार्लेतील जैन मंदिरावर न्यायालयाच्या आदेशावरून केलेली कारवाई आणि त्यानंतर लगेच अधिकाऱ्याची बदली – या घटनेमुळे महापालिका प्रशासन, राजकीय हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांतील असंतोष या तिघांमधील संघर्ष उघड झाला आहे.

Related Articles