Friday, May 2, 2025

ओबीसींसाठी नव्या हक्कांची मागणी

दिल्लीतील ओबीसींचे देशव्यापी आंदोलन गाजले! महेंद्र ब्राह्मणवाडे यांची उपस्थिती

(नवी दिल्ली, २ एप्रिल २०२५) – ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी देशव्यापी स्तरावर आंदोलन उभे राहत आहे. बीसी वेल्फेअर असोसिएशन (तेलंगणा व आंध्रप्रदेश) आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये देशभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतला.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि भाषणे

या आंदोलनाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाषण करताना ओबीसींच्या मागण्यांबद्दल सरकारला जाब विचारला. त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात, पण गेल्या दहा वर्षांत ओबीसींसाठी एकही ठोस योजना त्यांनी आणली नाही. आता हे आंदोलन संपूर्ण देशभर उभारले जाईल.”

याशिवाय, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सांसद असदुद्दीन ओवेसी, सांसद सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे, प्रणिती शिंदे, खासदार कन्निमोळी, संसद विल्सन, संसद मनोज कुमार झा, पंजाब काँग्रेस प्रेसिडेंट अमरेंद्र सिंग राजा, तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आणि इतर अनेक ओबीसी नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या:

1. जातनिहाय जनगणना त्वरित करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.


2. ओबीसी आरक्षणाची ५०% मर्यादा हटवावी व क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवावी.


3. तेलंगणात वाढवलेले ४२% ओबीसी आरक्षण संविधानाच्या नवव्या अनुसूचीत टाकावे.


4. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी २७% आरक्षण देण्याचा कायदा करावा.


5. मंडल आयोग व स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.


6. ६० वर्षावरील शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना लागू करावी.


7. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करावा.


8. ओबीसींसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावेत.


9. केंद्र सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी.


10. २०१४ पासून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही ‘नॉन-क्रिमीलेअर’ सर्टिफिकेटच्या अडचणीमुळे नियुक्ती न मिळालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा.



ओबीसी हक्कांसाठी पुढील रणसंग्राम?

या आंदोलनानंतर देशभरात ओबीसींसाठी एक नवा लढा उभा राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महेंद्र ब्राह्मणवाडे यांसारखे अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते या चळवळीला अधिक बळ देण्यास सज्ज आहेत.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान; आमदार बडोले यांचा दौरा

आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले

करेगुट्टाच्या जंगलात देशातील सर्वात मोठं नक्षलविरोधी ऑपरेशन – थरार, रणनीती आणि निर्णायक क्षण

देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.

कोहळीटोला गावातील एक दीप अचानक मालवला!”

"झाडीपट्टीतील एक तेजस्वी स्वर हरपला! कोहळीटोला येथील माजी सरपंच व उत्कृष्ट गायक जिवनलालजी लंजे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न."

Related Articles