वृत्तसंस्था | वर्ता.कॉम
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव गावाने इतिहास घडवणारी बातमी दिली आहे. येथील सुकन्या कु. शाश्रुती विनायक नाकाडे हिने अवघ्या ११ तासांत पाल्क समुद्रधुनी पार करून एक विलक्षण पराक्रम गाठला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटत असून, विविध स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
सागर पार करण्याचा तिचा प्रवास केवळ शारीरिक कसोटीचा नव्हता, तर मानसिक शक्ती आणि जिद्दीचाही होता. या प्रकारात यश मिळवणाऱ्या अतिशय कमी तरुणींमध्ये शाश्रुतीचे नाव आता सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. तिच्या या धाडसी प्रयत्नाबद्दल आमदार राजकुमार बडोले यांनी तिचे विशेष अभिनंदन करत म्हणाले की, “शाश्रुतीने उभारलेला हा मैलाचा दगड भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल.”
हा प्रवास केवळ वैयक्तिक यश न राहता, संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाचे प्रतीक ठरला आहे.
