Sunday, June 1, 2025

मंत्रिमंडळ विस्तारात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विसर

गोंदिया : प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्ह्याला आगामी अडीच वर्षांसाठी पुन्हा एकदा ‘पार्सल पालकमंत्री’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले असले, तरी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते आणि जिल्हावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील विस्तारामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पुन्हा एकदा संधी नाकारली गेल्यामुळे या भागातील जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. स्थानिकांच्या मते, जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले असते तर या भागाचा विकास अधिक वेगाने झाला असता. मात्र, अनेकांच्या दृष्टीने हे जाणूनबुजून टाळण्यात आले आहे, आणि यासाठी थेट प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली जात आहे.

तिरोड्यातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभेत पहिल्यांदा कमळ फुलवणारे विनोद अग्रवाल तसेच अर्जुनी मोरगावमधून विजयी झालेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे इंजिनिअर राजकुमार बडोले यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळेल, अशी जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षाभंगामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे.

गोंदियाचे अपूर्ण स्वप्न : ‘घरचे मंत्री’

गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा आहे. महायुती सरकारमधील अजित पवार गटाचा मजबूत सहभाग लक्षात घेता, गोंदियाला मंत्रीपद मिळेल, असा विश्वास होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात गोंदियाला वगळले गेले.

पाच वर्षांत पाच ‘पार्सल पालकमंत्री’

२०१९ पासून गोंदिया जिल्ह्याला सलग पाच परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले. या पालकमंत्र्यांनी प्रामुख्याने २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट किंवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्ह्याला भेट दिली आणि त्वरित परतल्याचा अनुभव गोंदियाकरांना आहे. परिणामी, गोंदियात त्यांना ‘झेंडा मंत्री’ असे टोकाचे नाव दिले गेले.

नव्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा

गोंदिया जिल्ह्याला पुढील पालकमंत्री कोण मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परजिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्त होणे निश्चित झाले असले, तरी त्यांनी मागील डाग पुसून काढावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने उपस्थित राहून काम करणे, हे नवे पालकमंत्र्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा

जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. या परिस्थितीत स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

गोंदिया जिल्हा विकासासाठी सक्षम नेतृत्वाच्या प्रतिक्षेत असून, आता राज्य सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळले; पटेलांशी तणावाचे जुने वाद चर्चेत

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात धर्मराव बाबा आत्राम यांना वगळण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात त्यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळात स्थानिक पातळीवर अनेक मुद्दे चर्चेत राहिले. विशेषतः, प्रफुल पटेल आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यातील वादामुळे राजकीय वातावरण तापले होते.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःख

सडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.

यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!"

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!

नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.

१२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस...

कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!

शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने "विकसित कृषी संकल्प अभियान" सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

वाउचर मशीनमधून फसवणूक? अर्जुनीत शेतकऱ्यांच्या धान्यावर चाललीये लूट!

अर्जुनी/मोर येथील सेवा सहकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात वाउचर मशीनचा तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

९० गाव, एक निर्धार: भंडाऱ्यातील रथयात्रेचा शेती क्रांतीकडे प्रवास सुरू!

भंडाऱ्यातील ९० गावांमध्ये रथयात्रेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शेतीतंत्रज्ञानाचा संदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन!

हा खरंच मोसमी पाऊस आहे का? डॉ. देवरस यांच्या निरीक्षणाने वाढली उत्सुकता!

राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!

Related Articles

0
Would love your thoughts, please comment.x
()
x