Friday, May 9, 2025

अग्रवाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ट्रेलर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

सडक अर्जुनी, 10 डिसेंबर: रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील देवपायली येथील शशीकरण मंदिराजवळ उड्डाणपूल बांधणीचे काम अग्रवाल कंपनीकडून सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना आणि बॅरिगेट्स नसल्यामुळे आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

रायपूरहून नागपूरकडे जात असलेला 16 चाकी ट्रेलर (क्रमांक CG 22 J 7303) मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात सेफ्टी बॅरिगेट्स नसलेल्या सर्व्हिस रोडवरून खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रेलर चालक भूपेंद्र अंबरनाथ यादव (वय 35, रा. भिलाई) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पत्रकार मुन्ना सिंग ठाकूर यांनी स्थानिक बीट जमादार विजय कोटांगले यांना कळवले आणि महावितरण कार्यालयाला विद्युतपुरवठा खंडित करण्याचे सूचित केले. हेड्राच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची पुढील चौकशी डुग्गीपार पोलीस करीत आहेत.

महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी आणि अग्रवाल कंपनीकडून सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या गंभीर दुर्घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

बोधगया महाबोधी मंदिर प्रकरणावर राज्यातून आवाज — राजकुमार बडोले फाउंडेशनचा आंदोलनाला पाठिंबा

राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था बोधगया येथे 5 मे रोजी रवाना झालेला आहे. महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनाला फाउंडेशनचा थेट पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Articles