अर्जुनी मोरगावच्या तावसी येथील साई श्रध्दा लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या विजयासाठी निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला.
बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यात सिंचन, शेती, रोजगार, पर्यटन विकास, तसेच महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या अविरत चालू ठेवण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही भेदभावाशिवाय एकजुटीने काम करून श्री बडोले यांना विधानसभेत बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपले प्रयत्न एकत्रित करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राजकुमार बडोले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, नारायण भेंडारकर, दाणेश साखरे, उद्धव मेहंदळे, योगेश नाकाडे, मंजूषा बारसागडे, सुशीला हलमारे, सुशीला राऊत, घनश्याम मेहता, राकेश जायस्वाल, किशोर ब्राह्मणकर, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, लता दृगकर, निशाताई मस्के, नागपुरे ताई, रतिराम राणे, सागर आरेकर, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, माधुरी बनपूरकर, अनिशा पठाण तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःखसडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.- यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई“अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!”
संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.- १२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बाजार समितीचे सचिव यांनी तब्बल १२९ मेट्रिक टन बोगस खतांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित सचिवाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या विशेष तपासणी पथकाने केली आहे. प्राथमिक तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की, शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सरकारच्या निधीतून… Read more: १२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!
- कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने “विकसित कृषी संकल्प अभियान” सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.