Saturday, April 19, 2025

निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी; बीड, परभणी प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

नागपूर: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार आणि परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घडलेल्या नासधूस व त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून स्वतंत्रपणे केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणांवर विधानसभेत सविस्तर उत्तर देत घटनांशी संबंधित कारवाईची माहिती दिली.

बीड सरपंच हत्या प्रकरण:

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीशी संबंधित असल्याचा संशय असून ती अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे. देशमुख यांच्या डोळ्यांना मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत वाल्मिक कराड याचा सहभाग आढळून आला आहे. कराडचा देशमुख हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील खंडणीखोर, भूमाफिया आणि वाळू माफियांचा कडेलोट करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली करून जबाबदारी योग्यप्रकारे न पाळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

परभणी हिंसाचार प्रकरण:

परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नासधूस व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ यांना श्वसनाचा जुना आजार होता आणि गळ्याचे हाड आधीच तुटले होते, असे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी सोमनाथ यांच्यावर अनावश्यक बळाचा वापर केला का, याची चौकशी केली जाईल. संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

आमदार राजकुमार बडोले यांची परभणी प्रकरणी न्यायाची मागणी

नागपूर: परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नासधूस व त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

आमदार बडोले यांनी या प्रकरणात पोलिसांवरील कारवाईचा मुद्दा मांडत, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी केली. त्यांनी सांगितले की, “सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजातील होतकरू युवक होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाची कोठडीत मृत्यू होणे दुर्दैवी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांवरील विश्वास उडण्याचा धोका आहे.”

सत्याचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी:

बडोले यांनी या प्रकरणात सखोल चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशीची मागणी केली होती. तसेच त्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर आणि संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली.

आमदार बडोले यांनी परभणीतील तणावग्रस्त परिस्थितीची सखोल चौकशी होऊन दोषींना योग्य शिक्षा व्हावी, असे सांगितले. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत, संबंधित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.

आर्थिक सहाय्य व पीडितांना पाठिंबा:

आमदार बडोले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणीही केली होती, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले.

आमदार राजकुमार बडोले यांच्या कडक भूमिकेमुळे परभणी प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले गेले आणि न्यायाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहेत.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

१४ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प! शेतीचे भवितव्य बदलणार?

उमरझरी लघु प्रकल्पातील मुख्य कालवा प्रणालीच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. १४ कोटी ३१ लाख निधीतून सात लघु कालव्यांची सुधारणा होणार असून, या उपक्रमामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित वेमुला कायद्याची मागणी

रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारख्या हुशार तरुणांच्या आत्महत्या या शिक्षण व्यवस्थेतील क्रूर भेदभावाचे परिणाम आहेत. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची विनंती करतो, जेणेकरून कोणत्याही भारतीय मुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर, रोहित वेमुला आणि लाखो इतरांनी सहन केलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही," राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले.

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

Related Articles