Sunday, April 20, 2025

पवार साहेबांनी भ्रम पसरवू नये – बावनकुळे

मारकडवाडीतील मतदान आकडेवारीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मारकडवाडी येथील मतदान आकडेवारीचा दाखला देत त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एक्स (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

“मारकडवाडी हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, मारकडवाडी गावाने कधीच कोणत्याही एकाच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. या गावातील मतदारांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये कधी राष्ट्रवादी काँग्रेसला, कधी अपक्ष उमेदवारांना, तर कधी भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे हे गाव शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी असल्याचा गैरसमज पसरवला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०१४, २०१९, आणि २०२४ मधील मतदानाचा आकडेवारीचा दाखला

बावनकुळे यांनी २०१४, २०१९, आणि २०२४ च्या निवडणुकांमधील आकडेवारी सादर केली आहे:

  • २०१४ लोकसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मते मिळाली, तर महायुतीतील सदाभाऊ खोत यांना ६६४ मते मिळाली.
  • २०१४ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली, तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.
  • २०१९ लोकसभा निवडणूक: भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना ३९५ मते मिळाली.
  • २०१९ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना १३४६ मते मिळाली, तर भाजपाचे राम सातपुते यांना ३०० मते मिळाली.
  • २०२४ लोकसभा निवडणूक: राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मते मिळाली, तर भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मते मिळाली.
  • २०२४ विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना ८४३ मते मिळाली, तर भाजपाचे राम सातपुते यांना १००३ मते मिळाली.

“ईव्हीएमवर आरोप करण्याऐवजी आकडेवारी तपासा”

बावनकुळे यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे की, “लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला यावेळी नाकारले आहे. त्यामुळे ईव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी या गावाच्या मतदारांच्या निर्णयाचा आदर करा. मारकडवाडीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मतदार कधी भाजपाला साथ देतात, तर कधी राष्ट्रवादीला, आणि कधी अपक्ष उमेदवारांना. हे गाव कोणत्याही एका पक्षाचे गड नाही.”

बावनकुळे यांच्या या टीकेमुळे आगामी निवडणुकांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

१४ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प! शेतीचे भवितव्य बदलणार?

उमरझरी लघु प्रकल्पातील मुख्य कालवा प्रणालीच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. १४ कोटी ३१ लाख निधीतून सात लघु कालव्यांची सुधारणा होणार असून, या उपक्रमामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित वेमुला कायद्याची मागणी

रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारख्या हुशार तरुणांच्या आत्महत्या या शिक्षण व्यवस्थेतील क्रूर भेदभावाचे परिणाम आहेत. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची विनंती करतो, जेणेकरून कोणत्याही भारतीय मुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर, रोहित वेमुला आणि लाखो इतरांनी सहन केलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही," राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले.

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

Related Articles