Saturday, April 19, 2025

माईसाहेबांच्या ११६व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माईसाहेबांचे स्थान केवळ सहधर्मचारिणीचे नव्हते, तर त्यांच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या एक दृढ आधारस्तंभ होत्या. जरी माईसाहेबांना बाबासाहेबांचा सहवास केवळ आठ-नऊ वर्षांचा लाभला असला, तरीही तो काळ भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरला.

१९४७ ते १९५६ या दशकात बाबासाहेबांनी अनेक ऐतिहासिक कार्ये पार पाडली—भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपासून हिंदू कोड बिलाच्या लढ्यापर्यंत, तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेतील सहभागापासून मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेपर्यंत. या प्रत्येक टप्प्यावर माईसाहेबांचा सक्रिय सहभाग राहिला. बाबासाहेबांच्या साहित्य निर्मितीमध्येही त्यांचा अमूल्य हातभार होता. दि बुद्ध अँड हिज गॉस्पेल, बुद्ध अँड हिज धम्म, फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम, रिडल्स इन हिंदुइझम, बुद्ध और कार्ल मार्क्स यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत माईसाहेबांची साथ होती.

परंतु या सर्व ऐतिहासिक घटनांमध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांनी घेतलेली बौद्ध धम्मदीक्षा. या दिवशी बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना आपल्या स्वहस्ते धम्मदीक्षा दिली आणि एका नवीन युगाचा प्रारंभ झाला.

माईसाहेबांचे जीवन हे केवळ बाबासाहेबांच्या सहवासाने नव्हे, तर त्यांच्या संघर्षशील आणि ध्येयनिष्ठ वृत्तीनेही उजळलेले होते. त्या केवळ बाबासाहेबांच्या जीवनसाथी नव्हत्या, तर त्यांच्या विचारांची, ध्येयधोरणांची आणि मिशनची अविरत सोबती होत्या.

विनम्र अभिवादन!

शुभेच्छुक : राजकुमार बडोले, माजी मंत्री,
राजकुमार बडोले फाउंडेशन

Hot this week

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

रोहित वेमुला कायद्याची मागणी

रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारख्या हुशार तरुणांच्या आत्महत्या या शिक्षण व्यवस्थेतील क्रूर भेदभावाचे परिणाम आहेत. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची विनंती करतो, जेणेकरून कोणत्याही भारतीय मुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर, रोहित वेमुला आणि लाखो इतरांनी सहन केलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही," राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले.

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

फडणवीस यांना उच्च न्यायालयाचे समन्स – निवडणुकीतील घोळ प्रकरण गाजणार!

विधानसभा निवडणुकीतील संभाव्य घोळ प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले असून ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles