Sunday, June 1, 2025

मोबाईल स्फोटाने दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर जखमी

साकोली: मोबाईल फोनचा स्फोट होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत प्रवास करणारा सहप्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना टोला सिरेगावबांध-सानगडी मार्गावर घडली. हा अपघात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास झाला.

मृतक आणि जखमींची ओळख

या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेश भिकाजी संग्रामे (वय ५४) असे असून ते टोला सिरेगावबांध (ता. साकोली) येथील रहिवासी होते. ते गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत देसाईगंज-वडसा पंचायत समितीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नत्थू गायकवाड असे आहे, आणि त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी सुरेश संग्रामे हे त्यांच्या नातेवाईक नत्थू गायकवाड यांच्यासोबत कामानिमित्त सानगडी येथे गेले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास टोला सिरेगावबांधला परतत असताना सिरेगाव-सानगडी मार्गावर केसलवाडा फाट्याजवळ हा अपघात घडला.

सुरेश संग्रामे यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर स्फोटामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. त्यामुळे मागे बसलेले नत्थू गायकवाड गंभीर जखमी झाले.

गावात हळहळ व्यक्त

सुरेश संग्रामे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळख असलेल्या संग्रामे यांच्या मृत्यूमुळे शाळा आणि गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून मोबाईल स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेने मोबाईल वापराबाबत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःख

सडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.

यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!"

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!

नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.

१२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस...

कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!

शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने "विकसित कृषी संकल्प अभियान" सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

वाउचर मशीनमधून फसवणूक? अर्जुनीत शेतकऱ्यांच्या धान्यावर चाललीये लूट!

अर्जुनी/मोर येथील सेवा सहकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात वाउचर मशीनचा तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

९० गाव, एक निर्धार: भंडाऱ्यातील रथयात्रेचा शेती क्रांतीकडे प्रवास सुरू!

भंडाऱ्यातील ९० गावांमध्ये रथयात्रेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शेतीतंत्रज्ञानाचा संदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन!

हा खरंच मोसमी पाऊस आहे का? डॉ. देवरस यांच्या निरीक्षणाने वाढली उत्सुकता!

राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!

Related Articles