नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.
राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!
दिल्ली विद्यापीठातील 60% प्राध्यापक व 30% सहयोगी प्राध्यापक पदे अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असूनही 'Not Found Suitable' (योग्य उमेदवार सापडले नाहीत) या कारणावरून रिक्त ठेवली गेली आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी याला ‘नव्या स्वरूपातील मनुवाद’ ठरवत, मोदी सरकारवर शिक्षण व नेत्यांच्या संधींपासून वंचित ठेवण्याचा डाव आखत असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने परभणी जिल्ह्यासाठी २७ मे ते २९ मे २०२५ या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे.