दिल्ली विद्यापीठातील 60% प्राध्यापक व 30% सहयोगी प्राध्यापक पदे अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असूनही 'Not Found Suitable' (योग्य उमेदवार सापडले नाहीत) या कारणावरून रिक्त ठेवली गेली आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी याला ‘नव्या स्वरूपातील मनुवाद’ ठरवत, मोदी सरकारवर शिक्षण व नेत्यांच्या संधींपासून वंचित ठेवण्याचा डाव आखत असल्याचा आरोप केला.
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."
बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार
देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.
रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारख्या हुशार तरुणांच्या आत्महत्या या शिक्षण व्यवस्थेतील क्रूर भेदभावाचे परिणाम आहेत. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची विनंती करतो, जेणेकरून कोणत्याही भारतीय मुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर, रोहित वेमुला आणि लाखो इतरांनी सहन केलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही," राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले.
भारतीय रेल्वेच्या सचखंड एक्सप्रेसने अमृतसर आणि नांदेड या दोन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना जोडणारे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या ट्रेनची लंगर सेवा आणि उत्तम सुविधा प्रवाशांना विशेष अनुभव देतात. त्यामुळे, भारतीय रेल्वेच्या मोठ्या नेटवर्कमधील ही ट्रेन संस्कृती, परंपरा आणि सेवा यांचे अनोखे मिश्रण आहे.
देशभरातील ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी 2 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलन संपन्न झाले. बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगणा-आंध्रप्रदेश व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हजेरी लावली. जातनिहाय जनगणना, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, 50% आरक्षण मर्यादा हटवणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.