Sunday, June 1, 2025

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया (बिहार), 7 मे 2025 –
तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या पवित्र भूमीवर सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलन आता अधिक तीव्र होत चालले आहे. बौद्ध धर्मीयांना महाबोधी मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा हक्क मिळावा, या मागणीसाठी देशभरातून बौद्ध समाज एकवटत आहे. अशा निर्णायक वेळी राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री व विद्यमान आमदार इंजिनिअर राजकुमार बडोले स्वतः बोधगया येथे दाखल होऊन आंदोलनास सक्रिय पाठिंबा जाहीर केला.

बडोले यांचा स्पष्ट इशारा:
“या आंदोलनाचं यश हे केवळ शासनावर अवलंबून नाही, तर आपल्या एकजुटीवरही आहे. आपसात आरोप-प्रत्यारोप करून आपणच आपला लढा कमजोर करत आहोत. हा वेदनादायक सत्य आहे. म्हणूनच मी सर्व भिक्षु वर्ग, उपासक-उपासिका आणि बौद्ध समाजाला आवाहन करतो – एकत्र या, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बिहार सरकारकडे ठोस मागणी:
बडोले यांनी बिहार सरकारकडेही स्पष्ट शब्दांत मागणी केली की, “महाबोधी मंदिराला फक्त पर्यटनस्थळ किंवा औद्योगिक प्रकल्प समजून वागू नका. ही बौद्धांची आत्मा आहे. त्यावर फक्त आणि फक्त बौद्ध समाजाचा हक्क आहे.”

जत्था सहभागी:
या दौऱ्यात राजकुमार बडोले फाउंडेशनचे ४५ सदस्य आंदोलनात सहभागी झाले असून, ते महाराष्ट्रातून आंदोलनासाठी विशेषतः दाखल झाले आहेत. हे सर्व सदस्य आंदोलनस्थळी बौद्ध भिक्षूंना सहकार्य करत आहेत आणि विविध आयोजनांमध्ये सहभागी होत आहेत.

सांस्कृतिक आणि सामाजिक लढ्याला नवे रूप:
बडोले यांच्या उपस्थितीने आंदोलनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. करुणा, शांती आणि समतेच्या तत्वांवर आधारित आंदोलन आता सामाजिक चेतनेचे रूप घेत आहे. आंदोलनात सहभागी अनेक कार्यकर्ते आणि बौद्ध भिक्षुंनी बडोले यांचे आभार मानले.

आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता:
या घटनाक्रमानंतर आंदोलन आता इतर राज्यांतही पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आणि उत्तर भारतातील बौद्ध समाजात संताप आणि असंतोष वाढू लागला आहे. पुढील टप्प्यात महाबोधी मुक्ती आंदोलन देशव्यापी रूप घेऊ शकते.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःख

सडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.

यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!"

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!

नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.

१२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस...

कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!

शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने "विकसित कृषी संकल्प अभियान" सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

वाउचर मशीनमधून फसवणूक? अर्जुनीत शेतकऱ्यांच्या धान्यावर चाललीये लूट!

अर्जुनी/मोर येथील सेवा सहकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात वाउचर मशीनचा तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

९० गाव, एक निर्धार: भंडाऱ्यातील रथयात्रेचा शेती क्रांतीकडे प्रवास सुरू!

भंडाऱ्यातील ९० गावांमध्ये रथयात्रेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शेतीतंत्रज्ञानाचा संदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन!

हा खरंच मोसमी पाऊस आहे का? डॉ. देवरस यांच्या निरीक्षणाने वाढली उत्सुकता!

राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!

Related Articles

0
Would love your thoughts, please comment.x
()
x