Saturday, April 19, 2025


“आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार – शेकडो समस्या सोडवल्या!”

अर्जुनी-मोर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. वन हक्क दावे आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यातील अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर काही प्रकरणे तपासणीसाठी पाठवण्यात आली.

या जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. अनेक नागरिकांनी वन हक्क दावे, महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शेती वसुली, तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात आपली गाऱ्हाणी मांडली.

आमदार बडोले यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “वन हक्क दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, कोणत्याही नागरिकाच्या हक्कांवर अन्याय होणार नाही. प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना केल्या जातील.”

महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती:

या विशेष जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, अर्जुनी-मोर तहसीलदार अनिरुद्धजी कांबळे, सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंतजी परशुरामकर, नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, प्रकल्प निष्कासन अधिकारी मेश्रामजी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव पवारजी, नवेगाव बांध अवघानजी, अर्जुनी-मोर बहुरेजी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, भाजप तालुकाध्यक्ष विजयजी कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोणे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद:

नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. अनेक नागरिकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार मानले. यामुळे वन हक्क दावे निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा आहे.

Hot this week

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

फडणवीस यांना उच्च न्यायालयाचे समन्स – निवडणुकीतील घोळ प्रकरण गाजणार!

विधानसभा निवडणुकीतील संभाव्य घोळ प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले असून ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नाना पटोले कुठे आहेत? काँग्रेसच्या यात्रेतून ठळक गैरहजेरीने वाढल्या चर्चेच्या ठिणग्या!

काँग्रेसची शांती यात्रा हे एकता आणि सलोख्याचे प्रतीक असले, तरी पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचे संकेतही तेवढेच स्पष्टपणे देऊन गेली. नाना पटोले यांची ही शांत गैरहजेरी, पक्षासाठी भविष्यातील वादळाची नांदी तर ठरणार नाही ना

Related Articles