Sunday, June 1, 2025

गडचिरोली: नक्षलवाद्यांवर पोलिसांचे मोठे यश

२१ ऑक्टोबर रोजी गडचिरोली-छत्तीसगड सीमेत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये प्रवेश करून ही कारवाई केली. या संदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. हा परिसर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याला लागून असून अबुझमाडमध्ये येतो. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवडाभरात विशेष लक्ष केंद्रित केले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या भागात अभियान सुरू केले.

ही चकमक गडचिरोली आणि नारायणपूर हद्दीत झाली. यासाठी सी ६० जवानांनी घनदाट जंगलातून २२ किमीचा पायी प्रवास केला. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० ची विभागीय समिती सदस्य जया उर्फ भुरी पादा (३१, उलिया, छत्तीसगड) आणि वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी उर्फ दसरू तुलावी (६५, गुरेकसा, गडचिरोली) यांचा समावेश आहे. याशिवाय, देवे रिता (२५), बसंत आणि सुखमती हे छत्तीसगडमधील रहिवासी नक्षलवादी होते. या सर्वांवर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस होते.

चकमकीत सी ६० जवान कुमोद आत्राम याला पायाला दोन गोळ्या लागल्या, ज्यामुळे त्याला नागपूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पत्रकार परिषदेला विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अभियान अंकित गोयल, तसेच पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ अजय कुमार उपस्थित होते.

सावजी तुलावीवर खून आणि जाळपोळ प्रकरणी एकूण २२६ गुन्हे दाखल आहेत. ६५ वर्षीय सावजी हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता आणि त्याने विविध पदांवर काम केले आहे. सद्यःस्थितीत तो कंपनी क्रमांक १० मध्ये पुरवठा विभागात कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस होते. गेल्या वर्षभरात झालेल्या चकमकीत आतापर्यंत २४ नक्षलवादी ठार झाले आहेत, ज्यामध्ये पोलिसांना आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची मोठी मदत मिळाली आहे.

या यशस्वी कारवाईमुळे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मोठा आघात झाला आहे, आणि स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही एक महत्त्वाची पाऊल आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाच्या निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःख

सडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.

यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!"

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!

नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.

१२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस...

कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!

शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने "विकसित कृषी संकल्प अभियान" सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

वाउचर मशीनमधून फसवणूक? अर्जुनीत शेतकऱ्यांच्या धान्यावर चाललीये लूट!

अर्जुनी/मोर येथील सेवा सहकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात वाउचर मशीनचा तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

९० गाव, एक निर्धार: भंडाऱ्यातील रथयात्रेचा शेती क्रांतीकडे प्रवास सुरू!

भंडाऱ्यातील ९० गावांमध्ये रथयात्रेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शेतीतंत्रज्ञानाचा संदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन!

हा खरंच मोसमी पाऊस आहे का? डॉ. देवरस यांच्या निरीक्षणाने वाढली उत्सुकता!

राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!

Related Articles

0
Would love your thoughts, please comment.x
()
x