Sunday, April 20, 2025

Maharashtra CM : आज ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड

मुंबई : भाजपा विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांना नियुक्त केले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्री यांच्यासह जवळपास ४० हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्यदिव्य कार्यक्रमात देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानात एकूण ३ स्टेज उभारण्यात येणार आहेत. यातील एक स्टेज मुख्य असणार आहे. या स्टेजवर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या स्टेजवरसगळे संत, समाजसेवक व अन्य लोकप्रतिनिधी असतील. तिसरे स्टेज हे संगीत संयोजनासाठी आहे. या तीन स्टेजच्या समोर खासदार, आमदार यांच्यासाठी जवळपास ४०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य व्हीआयपींसाठी जवळपास एक हजार आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. समोरील बाजूस माध्यमांसाठी जागा आहे.

पाच डिसेंबरला शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. दरम्यान, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे २१ ते २२ खाती असतील. यात गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चर्चा होणार आहे. याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ११ ते १२ मंत्री असतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये १६ खाती मागितली आहेत. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे.

उदय सामंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महायुती सरकारचा शपथविधी आता तोंडावर आला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शिंदेंचे शिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांवर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेचे संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड आणि इतर पाच नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. या बैठकीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवल्याची माहिती आहे. २३ नोव्हेंबरनंतर शिवसेना नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही पहिलीच बैठक आहे.

शिंदेंवर ज्युपिटरमध्ये झाले उपचार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी ते ज्युपिटर रूग्णालयात गेले होते. घसा दुखत असल्याने उपचार करून घेण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेले होते. तिथे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. शिंदे यांच्या पांढऱ्या पेशीही वाढल्या असल्याची माहिती आहे. सतत अँटिबायोटिक दिल्याने शिंदेंना अशक्तपणा जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसुद्धा ज्युपिटर रुग्णालयात सोबत होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर काही वेळातच त्यांना घरी सोडलं गेलं.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

१४ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प! शेतीचे भवितव्य बदलणार?

उमरझरी लघु प्रकल्पातील मुख्य कालवा प्रणालीच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. १४ कोटी ३१ लाख निधीतून सात लघु कालव्यांची सुधारणा होणार असून, या उपक्रमामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित वेमुला कायद्याची मागणी

रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारख्या हुशार तरुणांच्या आत्महत्या या शिक्षण व्यवस्थेतील क्रूर भेदभावाचे परिणाम आहेत. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मी कर्नाटक सरकारला रोहित वेमुला कायदा लागू करण्याची विनंती करतो, जेणेकरून कोणत्याही भारतीय मुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर, रोहित वेमुला आणि लाखो इतरांनी सहन केलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही," राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले.

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

Related Articles