Saturday, April 19, 2025

विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवावा – डॉ. शंकर बागडे

पवनी (जि. भंडारा):
कन्हाळगाव येथील प्रबुद्ध विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्याचा सखोल संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व माजी मुख्याध्यापक मा. अरविंद धारगावे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्ही. एस. वाणी यांची उपस्थिती लाभली होती. प्रारंभिक प्रास्ताविक के. एस. जांभूरे सरांनी केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. शंकर बागडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षण, अभ्यास आणि वाचन याला प्राधान्य दिले. त्यांनी अठरा ते एकवीस तास अभ्यास केला, विविध पदव्या प्राप्त केल्या, लाखो ग्रंथ वाचले आणि त्याचं संगोपन करण्यासाठी राजगृह सारखा ग्रंथालययुक्त बंगला उभारला.”

ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना आदर्श मानून शिक्षण, कष्ट आणि ज्ञानार्जनाच्या मार्गावर चालावे. समाज आणि देशासाठी मोठं योगदान द्यावं, हाच खरा अभिवादनाचा मार्ग आहे.”

या कार्यक्रमात मा. गोवर्धन खोब्रागडे, एस. एस. मेश्राम यांनी देखील मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मंगला निखाडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन एस. के. जांभूळकर सरांनी केले.

कार्यक्रमास जी. पी. नारनवरे, डी. एस. धारगावे, बी. एस. गजभिये यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली.

Hot this week

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

परदेशी शिक्षणासाठी शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या, पण अल्पज्ञात परदेशी शिष्यवृत्ती योजनेची अधिसूचना जारी केली आहे. QS रँकिंगच्या टॉप २०० मधील परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, निर्वाह भत्ता व विमान प्रवास खर्च शासनाद्वारे दिला जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता वेळ अत्यंत कमी आहे!

“महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचले नाही पाहिजे, या साठी DJ सारख्या हुल्लडबाजी संस्कृतीला जाणिवपूर्वक हवा दिली जात आहे!”

"महापुरुषांचे विचार विसरावेत यासाठीच तरुणांना DJ संस्कृतीकडे ढकललं जातंय का? समाजमाध्यमांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सुरू असलेली ही सांस्कृतिक खेळी उघड झाली पाहिजे."

ही भाकरी खाण्याआधी डोळे चोळा… बाबासाहेब स्वतः उतरलेत यावर!

माळीवाडा येथील एका चित्रकाराने भाकरीवर काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाकरीसारख्या दैनंदिन अन्नपदार्थावर साकारलेली ही कलाकृती जनतेच्या भावना, कष्ट, आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा यांचं प्रभावी दर्शन घडवते.

सुकाणू समितीला डावलून हिंदीची सक्ती? मराठीसाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी!

सुकाणू समितीला डावलत शिक्षणात हिंदी विषय सक्तीने आणण्याचा आरोप; मराठीच्या बाजूने राज ठाकरे यांचा आक्रमक इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध.

राज्यात ६५ नव्या बाजार समित्यांचा निर्णय — कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — राज्यात ६५ नवीन बाजार समित्यांची घोषणा; सर्वाधिक समित्या कोणत्या जिल्ह्याला?

शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ता वर्तुळातील अनेक शाळांचा सहभाग? शिक्षण आयुक्तांच्या तपासात मोठा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर शालार्थ आयडी प्रकरणात १०५६ शाळांची चौकशी सुरू. शिक्षण आयुक्तांनी तपासाचा धागा खेचल्यावर कोट्यवधींचा घोटाळा उघड.

फडणवीस यांना उच्च न्यायालयाचे समन्स – निवडणुकीतील घोळ प्रकरण गाजणार!

विधानसभा निवडणुकीतील संभाव्य घोळ प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले असून ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नाना पटोले कुठे आहेत? काँग्रेसच्या यात्रेतून ठळक गैरहजेरीने वाढल्या चर्चेच्या ठिणग्या!

काँग्रेसची शांती यात्रा हे एकता आणि सलोख्याचे प्रतीक असले, तरी पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचे संकेतही तेवढेच स्पष्टपणे देऊन गेली. नाना पटोले यांची ही शांत गैरहजेरी, पक्षासाठी भविष्यातील वादळाची नांदी तर ठरणार नाही ना

Related Articles