Friday, May 9, 2025

Maharashtra CM : आज ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड

मुंबई : भाजपा विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांना नियुक्त केले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्री यांच्यासह जवळपास ४० हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्यदिव्य कार्यक्रमात देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानात एकूण ३ स्टेज उभारण्यात येणार आहेत. यातील एक स्टेज मुख्य असणार आहे. या स्टेजवर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या स्टेजवरसगळे संत, समाजसेवक व अन्य लोकप्रतिनिधी असतील. तिसरे स्टेज हे संगीत संयोजनासाठी आहे. या तीन स्टेजच्या समोर खासदार, आमदार यांच्यासाठी जवळपास ४०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य व्हीआयपींसाठी जवळपास एक हजार आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. समोरील बाजूस माध्यमांसाठी जागा आहे.

पाच डिसेंबरला शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. दरम्यान, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे २१ ते २२ खाती असतील. यात गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चर्चा होणार आहे. याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ११ ते १२ मंत्री असतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये १६ खाती मागितली आहेत. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे.

उदय सामंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महायुती सरकारचा शपथविधी आता तोंडावर आला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शिंदेंचे शिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांवर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेचे संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड आणि इतर पाच नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. या बैठकीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवल्याची माहिती आहे. २३ नोव्हेंबरनंतर शिवसेना नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही पहिलीच बैठक आहे.

शिंदेंवर ज्युपिटरमध्ये झाले उपचार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी ते ज्युपिटर रूग्णालयात गेले होते. घसा दुखत असल्याने उपचार करून घेण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेले होते. तिथे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. शिंदे यांच्या पांढऱ्या पेशीही वाढल्या असल्याची माहिती आहे. सतत अँटिबायोटिक दिल्याने शिंदेंना अशक्तपणा जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसुद्धा ज्युपिटर रुग्णालयात सोबत होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर काही वेळातच त्यांना घरी सोडलं गेलं.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

बोधगया महाबोधी मंदिर प्रकरणावर राज्यातून आवाज — राजकुमार बडोले फाउंडेशनचा आंदोलनाला पाठिंबा

राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था बोधगया येथे 5 मे रोजी रवाना झालेला आहे. महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनाला फाउंडेशनचा थेट पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी मंदिराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या चळवळीला महाराष्ट्रातील नेतृत्वाचा पाठिंबा; ५ मे रोजी राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जत्था बोधगया जाणार

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Articles