Thursday, April 17, 2025


“आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार – शेकडो समस्या सोडवल्या!”

अर्जुनी-मोर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. वन हक्क दावे आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यातील अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर काही प्रकरणे तपासणीसाठी पाठवण्यात आली.

या जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. अनेक नागरिकांनी वन हक्क दावे, महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शेती वसुली, तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात आपली गाऱ्हाणी मांडली.

आमदार बडोले यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “वन हक्क दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, कोणत्याही नागरिकाच्या हक्कांवर अन्याय होणार नाही. प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना केल्या जातील.”

महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती:

या विशेष जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, अर्जुनी-मोर तहसीलदार अनिरुद्धजी कांबळे, सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंतजी परशुरामकर, नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, प्रकल्प निष्कासन अधिकारी मेश्रामजी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव पवारजी, नवेगाव बांध अवघानजी, अर्जुनी-मोर बहुरेजी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, भाजप तालुकाध्यक्ष विजयजी कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोणे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद:

नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. अनेक नागरिकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार मानले. यामुळे वन हक्क दावे निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा आहे.

Hot this week

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

नाना पटोले कुठे आहेत? काँग्रेसच्या यात्रेतून ठळक गैरहजेरीने वाढल्या चर्चेच्या ठिणग्या!

काँग्रेसची शांती यात्रा हे एकता आणि सलोख्याचे प्रतीक असले, तरी पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचे संकेतही तेवढेच स्पष्टपणे देऊन गेली. नाना पटोले यांची ही शांत गैरहजेरी, पक्षासाठी भविष्यातील वादळाची नांदी तर ठरणार नाही ना

विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवावा – डॉ. शंकर बागडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावा, असे प्रेरणादायी विचार प्रबुद्ध विद्यालयात ऐकायला मिळाले.

बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात

गट ग्रामपंचायत महालगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दीपप्रज्वलन व माल्यार्पणाचा सोहळा संपन्न झाला, तसेच "शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे..." या तत्त्वज्ञानावर मार्गदर्शन होऊन उपस्थितांमध्ये नवचैतन्य जागृत झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राजकुमार बडोले यांची विविध ठिकाणी उपस्थिती; गोपालटोली येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यात विविध गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांना भेट देत अभिवादन केले. बुद्ध विहार लोकार्पण, प्रतिमा पूजन आणि बौद्ध बांधवांशी संवाद साधत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

“निळे वादळ उसळले की…” – साकोलीत अभूतपूर्व बाईक रॅली!

साकोली शहरात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली भव्य बाईक रॅली म्हणजे विचारांचा निळा झंझावात! हजारोंच्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: नैतिक पुनर्जागरणाचे सम्राट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नव्हते, तर ते एक चळवळ होते, एक विचार होते, एक क्रांति होते. त्यांचे विचार आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या लढ्यात, प्रत्येक महिलेच्या हक्कांच्या मागणीत आणि प्रत्येक श्रमिकाच्या सन्मानाच्या मागणीत गूंजतात. त्यांनी आपल्याला शिकवले की, खरा मुक्तिदाता तो नाही जो सत्ता मागतो, तर तो आहे जो शोषितांना त्यांची स्वतःची शक्ती ओळखण्यास प्रेरित करतो. त्यांच्या जयंतीनिमित्त, आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांना आत्मसात करून समाजात समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय भीम! जय भारत!

रुग्णांना फळवाटप करून महापुरुषांना मानवंदना : शिक्षक संघाचा उपक्रम

"महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिकता न करता सामाजिक भान राखत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने रुग्णालयात फळवाटप करून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे."

राजकुमार बडोले यांच्या हस्ते भगवान बुद्ध मूर्तीचे अनावरण व विकासकामांचे भूमिपूजन, आंबेडकरी विचारांची उजळणी

आनंद बुद्ध विहार, बाक्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम; भगवान बुद्ध मूर्ती अनावरण व 10 लाख निधीतून सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन – आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत

Related Articles