Sunday, June 1, 2025

मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार, पण… : नाना पटोले

नागपूर: “ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेत गडबड केली जाते आणि मतांची चोरी होत असल्याचा संशय जनतेमध्ये आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर मतदान घेतले पाहिजे. जर मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार असेल, तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.

नाना पटोले नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएममधील मतदानाबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. “अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमच्या निकालांमध्ये तफावत दिसून येते. सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा दावा केला जातो, पण त्या वेळी मतदारांच्या रांगा कुठे होत्या, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. मला निवडणूक लढण्याचे आव्हान देणाऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून आणून दाखवावा,” असे आव्हान त्यांनी दिले.

फडणवीस यांना शुभेच्छा, पण महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावा, येथील युवकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, राज्यात सध्या दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, ती भरून युवकांना न्याय द्यावा. राज्य सरकारने कंत्राटी भरती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्यांनी कंत्राटी भरती करू नये. तसेच कापूस आणि सोयाबीनाला चांगला भाव मिळावा,” अशी अपेक्षा पटोलेंनी व्यक्त केली.

“शपथविधीला निमंत्रणच नव्हते”

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले, “मला शपथविधीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते. जर निमंत्रण मिळाले असते, तर मी शपथविधीला गेलो असतो. महायुतीच्या नेत्यांनी कोणा-कोणाला निमंत्रण दिले, हे मला माहिती नाही. पण मला तरी निमंत्रण नव्हते.”

नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मतपत्रिकेवर आधारित मतदानासाठीची त्यांची मागणी कितपत मान्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

अमित राऊत यांचे निधन; राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले दुःख

सडक अर्जुनीतील अमित राऊत यांच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. परिसरात हळहळ.

यू-ट्यूबवर अवमानकारक कारवाई

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाची यूट्यूबर अजय शुक्लावर थेट कारवाई!"

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा चेहरा!

नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची उपस्थिती चर्चेचा विषय; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सरसंघचालकांचे भाषणही ठरणार केंद्रबिंदू.

१२९ टन बोगस खताचा घोटाळा: लाखनीच्या सचिवाच्या अटकेमागील रहस्य!

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीमधून मोठा घोटाळा उघडकीस...

कृषी क्रांतीची नांदी… अड्याळ, पवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी योजनेचा पहिला झटका!

शेतीचे नियोजन ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते. याच दृष्टीने "विकसित कृषी संकल्प अभियान" सुरु करण्यात आले असून, पवणी तालुक्यातील अड्याल, सोनेगाव, पिंपळगाव व निपाणी येथे या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. या मोहिमेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

वाउचर मशीनमधून फसवणूक? अर्जुनीत शेतकऱ्यांच्या धान्यावर चाललीये लूट!

अर्जुनी/मोर येथील सेवा सहकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात वाउचर मशीनचा तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

९० गाव, एक निर्धार: भंडाऱ्यातील रथयात्रेचा शेती क्रांतीकडे प्रवास सुरू!

भंडाऱ्यातील ९० गावांमध्ये रथयात्रेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शेतीतंत्रज्ञानाचा संदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन!

हा खरंच मोसमी पाऊस आहे का? डॉ. देवरस यांच्या निरीक्षणाने वाढली उत्सुकता!

राज्यात पडणाऱ्या पावसाने अनेकांचे लक्ष वेधले असले, तरी तो मोसमी आहे की वळवाचा – याबाबत शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाने एक नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे निरीक्षण पुढील काही दिवसांत हवामानाचा कल स्पष्ट झाल्यावरच ठामपणे सिद्ध होईल, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हेच योग्य!

Related Articles