Monday, February 24, 2025

मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार, पण… : नाना पटोले

नागपूर: “ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेत गडबड केली जाते आणि मतांची चोरी होत असल्याचा संशय जनतेमध्ये आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर मतदान घेतले पाहिजे. जर मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार असेल, तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.

नाना पटोले नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएममधील मतदानाबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. “अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमच्या निकालांमध्ये तफावत दिसून येते. सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा दावा केला जातो, पण त्या वेळी मतदारांच्या रांगा कुठे होत्या, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. मला निवडणूक लढण्याचे आव्हान देणाऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून आणून दाखवावा,” असे आव्हान त्यांनी दिले.

फडणवीस यांना शुभेच्छा, पण महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावा, येथील युवकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, राज्यात सध्या दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, ती भरून युवकांना न्याय द्यावा. राज्य सरकारने कंत्राटी भरती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्यांनी कंत्राटी भरती करू नये. तसेच कापूस आणि सोयाबीनाला चांगला भाव मिळावा,” अशी अपेक्षा पटोलेंनी व्यक्त केली.

“शपथविधीला निमंत्रणच नव्हते”

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले, “मला शपथविधीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते. जर निमंत्रण मिळाले असते, तर मी शपथविधीला गेलो असतो. महायुतीच्या नेत्यांनी कोणा-कोणाला निमंत्रण दिले, हे मला माहिती नाही. पण मला तरी निमंत्रण नव्हते.”

नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मतपत्रिकेवर आधारित मतदानासाठीची त्यांची मागणी कितपत मान्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.

सडक अर्जुनीत स्वच्छता अभियानाने दिला स्वच्छतेचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

निर्दय हत्या प्रकरणी गोरेगावात धडक निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळा संपन्न

ग्राम शाखा खोबा/हलबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत अर्जुनी/मोरगाव येथे घरकुल मंजुरी व हप्ता वितरण

अर्जुनी/मोरगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

वनविभाग अडचणी दूर करण्याचा प्रस्ताव, बायपास निर्माणाचा विचार

कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक पार पडली. वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने बायपास रस्ता तयार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Related Articles