Friday, May 2, 2025


सत्तेवर गेले… पण मूळचं विसरले! – बडोले यांची धक्कादायक टीका

– वार्ता प्रतिनिधी | नवेगावबांध

“अनुसूचित जातीचे लोकप्रतिनिधी निवडून आले, सत्तेवरही गेले… पण त्यांनी अस्पृश्य समाजासाठी हवे तेवढे काही केलं नाही, ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे,” अशा कठोर आणि स्पष्ट शब्दांत माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी समाजातील विदारक वास्तव मांडलं आहे.

लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आजचा भारत’ या विषयावर झालेल्या चर्चेत बडोले यांनी विद्यमान दलित नेतृत्वावर अप्रत्यक्ष पण घणाघात करणारा टोला लगावला.

बडोले म्हणाले –
“राजकीय सत्तेचा वापर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी होताना दिसतो. समाजासाठी ठोस धोरणं राबवणं, शिक्षण, आरोग्य, न्याय मिळवून देणं – या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त भाषणापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. आंबेडकरी विचार केवळ बॅनरवर किंवा जयंत्यापुरता उरू नये; तो कृतीत उतरवणं गरजेचं आहे.”

सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर अनेक लोक मूळ समाजाशी नातं तोडतात, ही खंतही त्यांनी मांडली.
“बाबासाहेबांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकारांची आणि संधींची काय दिशा झाली? अनेकांनी त्या संधींचा वापर केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी केला, समाजासाठी नव्हे,” असे ते म्हणाले.

मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे –

आंबेडकरांनी अपेक्षित केलेला समतेचा भारत अजूनही दूर

राजकीय लोकप्रतिनिधींनी कृतीशून्य भूमिका घेतली

दलित समाजाचे मुद्दे केवळ निवडणुकीपुरते वापरले जात आहेत

सामाजिक जागृतीसाठी नव्या पिढीने नेतृत्व घ्यावं


राजकीय नेतृत्व आणि आंबेडकरी तत्वज्ञान यामध्ये निर्माण झालेल्या दरीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
“या देशात केवळ एक दोन चांगले नेता झाले म्हणजे पुरेसे होत नाही, प्रत्येक गावातून, वस्तीतून एक आंबेडकरी नेता घडायला हवा. बाबासाहेबांचं स्वप्न हे केवळ संविधान पुरतं नव्हतं, ते सामाजिक परिवर्तनाचं होतं,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

ही मुलाखत केवळ टीका नसून, अंतर्मुख करणारी होती – आणि नव्या पिढीला दिशा देणारी देखील.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान; आमदार बडोले यांचा दौरा

आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले

करेगुट्टाच्या जंगलात देशातील सर्वात मोठं नक्षलविरोधी ऑपरेशन – थरार, रणनीती आणि निर्णायक क्षण

देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.

कोहळीटोला गावातील एक दीप अचानक मालवला!”

"झाडीपट्टीतील एक तेजस्वी स्वर हरपला! कोहळीटोला येथील माजी सरपंच व उत्कृष्ट गायक जिवनलालजी लंजे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न."

Related Articles