Monday, February 24, 2025

विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल; ‘आता वास्तव स्वीकारा’

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “लोकांनी तुम्हाला नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही फक्त १६ जागा मिळाल्या, याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “लोकांच्या मनात काय चालले आहे, हे तुम्हाला कळले असते तर आज ही अवस्था झाली नसती. त्यामुळेच बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाहीत आणि नाना पटोले २०८ मतांनी थोडक्यात वाचले.”

‘रडीचा डाव किती दिवस?’ – अजित पवार यांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांवर हल्लाबोल करत विधानसभेत भाषण केले. “लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. तुम्ही मात्र विधानसभेला हरलात आणि ईव्हीएमला दोष देत रडीचा डाव खेळत आहात,” असे पवार म्हणाले.

पक्षफुटीनंतर राहुल नार्वेकर यांच्यावर झालेल्या टीकेचा संदर्भ देत ते म्हणाले, “विरोधकांनी ताळतंत्र सोडून टीका केली; पण नार्वेकर संयमी राहिले आणि ऐतिहासिक निर्णय दिले.”

थोरात-पटोले यांचा पराभव हा लोकभावनेचा संकेत – शिंदे

सभागृहात बोलताना शिंदे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांचा पराभव आणि नाना पटोले यांचा थोडक्यात बचाव हा लोकभावनेचा स्पष्ट संकेत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला लोकांनी नाकारले आहे. आता तरी विरोधकांनी वास्तव स्वीकारले पाहिजे आणि जनतेच्या मनातील भावना ओळखली पाहिजे.”

सभागृहात हशा आणि टोलेबाजी

“लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसवले, हे लक्षात ठेवा,” अशा मिश्किल शैलीत पवारांनी विरोधकांना चिमटा काढला. तर शिंदे यांनी विरोधकांना उपहासाने म्हटले, “तुम्ही ईव्हीएमला दोष देत आहात, पण लोकांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.”

सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये टीका-प्रतिटीकांच्या फैरी झडत असताना शिंदे आणि पवार यांच्या भाषणांमुळे वातावरण तापले होते.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.

सडक अर्जुनीत स्वच्छता अभियानाने दिला स्वच्छतेचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

निर्दय हत्या प्रकरणी गोरेगावात धडक निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळा संपन्न

ग्राम शाखा खोबा/हलबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत अर्जुनी/मोरगाव येथे घरकुल मंजुरी व हप्ता वितरण

अर्जुनी/मोरगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

वनविभाग अडचणी दूर करण्याचा प्रस्ताव, बायपास निर्माणाचा विचार

कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक पार पडली. वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने बायपास रस्ता तयार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Related Articles