Monday, February 24, 2025

ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय, जरांगे पाटलांचा मराठा समाजाला ‘मेसेज’

जालना : मराठा समाज हा राजकारण करण्यासाठी एकत्र आलेला नव्हता. आपण आरक्षणासाठी समाज म्हणून एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे. त्यांनी आरक्षणाचा घास आपल्या तोंडून हिरावला आहे, असा आरोप करून ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय आहे, अशी उघड भूमिका मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे की सत्ताधाऱ्यांना पाडायचे? यावर मंथन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी समाजाची बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. परंतु उमेदवार उभे केले पाहिजे की उमेदवार उभे न करता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम केले पाहिजे? यावर चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले.

रविवारी राज्यातील समाज एकत्र येत विधानसभेविषयी चर्चा करणार असून दिवसभर मॅरेथॉन बैठका संपन्न होतील. उद्याचा निर्णय हा निर्णायक आहे आणि यावेळी घाई गडबड असायला नको.
उद्या निर्णय चुकायला नको, या निर्णयामुळे समाज अडचणीत येता कामा नये. समाज हा राजकारण करण्यासाठी एक आला नव्हता, आम्ही समाज म्हणून केवळ आरक्षणाकरिता एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे, असे जरांगे म्हणाले.

ज्यांनी समाजाची फसगत केली, त्यांना संपविणे गरजेचे

समाजाची फसगत झाली नाही पाहिजे, आणि आपल्याला जे संपवायला निघाले आहेत, त्यांना संपवणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्याला संपवले त्यांना संपवण्यात देखील विजय असतो. समाज संपवायचा ज्यांनी विडा उचलला आहे तर त्यांनाही संपविणे आपले काम आहे. याला त्याला निवडून आणण्यापेक्षा आपल्या मुलांच्या भविष्यावर कोण गंडांतर आणतंय तोच संपला पाहिजे, हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळवता येतो, असे काही नसते. आपल्याविषयी जो वाईट विचार करतो, आपल्या समाजविषयी द्वेष आहे, त्याला हरवणे सुद्धा विजय असतो. मला दिसत आहे, सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक या सर्वांचे मत एकच होते, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.

सडक अर्जुनीत स्वच्छता अभियानाने दिला स्वच्छतेचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

निर्दय हत्या प्रकरणी गोरेगावात धडक निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळा संपन्न

ग्राम शाखा खोबा/हलबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत अर्जुनी/मोरगाव येथे घरकुल मंजुरी व हप्ता वितरण

अर्जुनी/मोरगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

वनविभाग अडचणी दूर करण्याचा प्रस्ताव, बायपास निर्माणाचा विचार

कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक पार पडली. वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने बायपास रस्ता तयार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Related Articles